Message Masala logo Message Masala
  • Events
  • About MM
  • Disclaimer
popular now
Anniversary1348 Birthday3233 Best Wishes107 Christmas207 Diwali844 Eid129 Exam76 Friendship4745 Funny13175 Good Morning21175 Good Night9291 Good Luck343 Get well Soon93 Happy New Year948 Holi1784 I love you466 Independence Day570 Inspirational7273 Love4835 Missing You401 Sorry101 Thank you8 Valentine Day1105 Contest Public1 Tours & Travels Public2 Festival321 Real Fact505 Special Days117 General Knowledge718 Heart Touch Story639 Good Habit81 Healthy Tips196 Marathi Ukhane870 Romantic475 Local Events18 Restaurants Public30 Real Estate Public0 Social Work Public8 Lifestyle Public2 Famous Places5 Poem1608 Tips10 Ganapati488 Random Thoughts735 Childrens Day26 Dance2 Shayari14992 Republic Day339 Rose Day613 Propose Day215 Chocolate Day395 Teddy Day458 Promise Day488 Hug Day350 Kiss Day658 Horoscope2 Shiv Jayanti721 Training center0 Maha Shivaratri76 Womens Day598 Quotes9560 Fathers Day315 Backgrounds1 Rakhi294 Dahi Handi102 UI UX79 Navratri99 Dussehra278 26 January382 Maker Sankranti327 MM Wishes0 Corona Virus224 Good Comments476 Education0 Hairstyle1 Message Masala4 Adivasi din60 Old Memories57 Business Ideas1 Emotional Status2282 Shradhanjali208 Inspiration Video4 Motivational5789 Sports0 Mothers day445 Teachers day85 fitness quotes5 Good Evening434 Technology1 Ambedkar Jayanti14 Gudi Padwa76 Mahatma Phule2 Parents day55 Ashadi Ekadashi10 Guru Purnima83 Farewell100 Jai Shri Ram1 Jobs All10 Best Dialogues65 Impress Someone2 Corporate Frames0
corporate
Real Estate30 Tours and Travels13 Jobs123 Contest4 Electronics3 Doctors and Specialist3 My Health7 Fashion Jewellery19 MM Jewel Hub24 Healthy Tips82 pppp0

Top Messages

user avatar
Vilas L
General Knowledge - 2553 msgs

पालकांसाठी आणि मुलांसाठी,                                                                 अनेकदा शाळेची पुस्तके फाटतात, हरवतात. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. किंवा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं. काळजी करू नका http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx                                              या वेबसाईटवर जा.                                                                                  तिथे इयत्ता निवडा, भाषेचे माध्यम निवडा                                                       (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu)                                                                                                 आणि तुम्हाला पाहिजे ते शालेय पुस्तक पीडीएफ फाईल मधे डाऊनलोड करून घ्या. आणखी एक करा, शक्य तितक्या पालकांपर्यंत हा निरोप पोहोचवा.

Read More ...
user avatar
Satish P
General Knowledge - 1923 msgs

*'आधार'मुळे भारताला ‘सिव्हील डेथ’चा धोका: एडवर्ड स्नोडेन*

अमेरिकेची गोपनिय माहिती लीक करणारा अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेनने ‘आधार’बाबत मोठा धोका व्यक्त केला आहे. UIDAI ने आधारच्या माध्यमातून सार्वत्रिक दक्षता प्रणाली तयार केली आहे. मात्र भारतीयांनी आधारशी सर्व काही जोडल्याने, भारताला ‘सिव्हील डेथ’ अर्थात व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका आहे, असं स्नोडेनने म्हटलं आहे.

आधार नंबरशी फोन नंबर लिंक केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्या वादाबाबत बोलताना स्नोडेनने हा धोका व्यक्त केला. स्नोडेनने त्यासाठी नुकतंचमोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झालेल्या आणि नंतर गुगलने स्पष्टीकरण दिलेल्याआधारच्या कस्टमर केअर नंबरचा दाखला दिला.

स्नोडेन म्हणाला, “यूआयडीएआयने हॅकिंगप्रकरणात ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यामध्ये फायदे कमी आणि दक्षता घेण्याच्या सूचनाच जास्त दिल्या आहेत”.

पत्रकारांनी जयपूरमध्ये आयोजिक केलेल्या एका कार्यक्रमात स्नोडेनने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. त्यामध्ये त्याने ‘आधार’बाबत आपली मतं व्यक्त केली.

“भारतातील आधारसक्ती धडकी भरवणारी आहे. कारण भारतात प्रत्येकाला आधार सक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात केली आहे की, तुम्ही तिथे बाळाला जन्म देण्यापूर्वी असो किंवा बाळाचा जन्म दाखला असो, सगळीकडे आधारसक्ती आहे”, असं स्नोडेनने नमूद केलं.

ज्या एजन्सी, संस्था आधार माहितीचा गैरवापर करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा सल्ला यावेळी स्नोडेनने दिला. शिवाय स्नोडेनने UIDAI करत असलेल्या युक्तीवादावरही टीका केली.

आधार हा एक मोठा घोटाळा आहे. त्यामुळे यूआयडीएआयने त्याबाबत योग्य त्या मार्गाने  युक्तीवाद करावा. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर खटले भरण्यापेक्षा त्यांनी सिस्टीम सुधारण्यावर भर द्यावा, असं स्नोडेन म्हणाला.

तुमचे हक्क, माहिती सुरक्षितता किंवा तुमच्या प्रायव्हसीची चिंता करु नका, असं सरकार सांगत असलं, तरी तीच मोठी फसवणूक आहे.  ही जर्मनीच्या गोबेल्स नीतीशी नातं सांगणारं आहे, असा आरोपही स्नोडेनने केला.

भारतात आज जिकडे तिकडे आधार नंबर मागितला जातो. आधारशिवाय एकही काम होत नाही.  त्यामुळे तुमचा आधार नंबर सर्वत्र पसरत असल्यामुळे हळूहळू तुम्ही प्रत्येक ठिकाणी अडकत आहात, असं स्नोडेनने नमूद केलं.

https://abpmajha.abplive.in/technology/indians-could-face-civil-death-with-aadhaar-linking-snowden-576425/amp

Read More ...
user avatar
Vinod P
General Knowledge - 5815 msgs

🤔 परीक्षा झाल्यावर पुढे काय?

LetsUp | Parenting

💫 विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा म्हणजे दहावी-बारावीची परीक्षा! या परीक्षा पास झाल्यावर पुढे काय करायचं, करिअरसाठी कोणतं क्षेत्र निवडायचं, याचा निर्णय सगळ्याच विद्यार्थ्यांना घ्यायचा असतो. हा निर्णय खूप महत्वाचा असतो कारण आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी या निर्णयावर अवलंबून असतात आणि मुलांच्या करिअरबाबतीत निर्णय घेताना पालकांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे ठरते.

👉 पालकांनी या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात :

▪ तुमची एखादी इच्छा अपुरी राहिली म्हणून तुमच्या पाल्याला तसे किंवा तेच करायला भाग पाडू नका. मुलांच्या कलाने घ्या, त्यांना कशात रस आहे ते ओळख आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा.

▪ दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढती आहे, त्यामुळे मुलांचा एखाद्या विषयातला रस आणि त्यात करिअर केल्याने कितपत पैसे मिळू शकतो याचा विचार अवश्य व्हायला हवा.

▪ मुलांना निर्णय घेण्यात मदत करतेवेळी पुढच्या किमान पाच ते दहा वर्षांचा विचार करून मार्ग दाखवा.

▪ सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांना धीर द्या, ते एका नव्या जगात प्रवेश करत असताना त्यांना पालकांनी मदत करणे महत्वाचे ठरते.

🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा :

Read More ...
user avatar
Kishor B
General Knowledge - 2827 msgs

⚡ *‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’*⚡
हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल. 
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’
ही संज्ञा वापरली आहे.

*रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.**

लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

⚡ *प्लेटलेट्सचं कार्य*⚡

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते. 

अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

⚡ *प्लेटलेट्सची संख्या*⚡

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.

संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.

संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

⚡ *प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं**

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी

⚡ *संख्या कमी झाल्यास..*

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

⚡ *प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी*:

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                       
 ⚡ *नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ*.
 
*जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.*

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. *काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.*

पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

⚡ *१.पपई* ⚡

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.
 
⚡ *२.गुळवेल* ⚡

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

⚡ *३.आवळा* ⚡

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.
 
⚡ *४.भोपळा* ⚡

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

⚡ *५.पालक* ⚡

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

⚡ *६.नारळ पाणी*  ⚡

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

⚡ *७ बीट*  ⚡

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
🌞®🌞
*Please share to all to improve health*💐

Read More ...
user avatar
Vedkush P
General Knowledge - 5208 msgs

पुणे .... बापरे बाप !!

 गणेशोत्सवानिमित्ताने सदाशिव पेठेतील एक पाटी- ,,,,,

”कृपया कोणीही वर्गणी मागण्यास येऊ नये. आमच्याही घरी बाप्पाचे आगमन होते. आम्ही तुमच्याकडे मागतो का?”

या पाटीला उत्तरादाखल शेजारी लगेच दुसरे दिवशी आणखी एक पाटी लागली-

”…मग सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठमोठे देखावे बघण्यासाठी तोंड वर करून घराबाहेर पण पडू नका. तसे देखावे घरातच करा.”
🤭🤭🤭🤭

तिसरे दिवशी पुढील पाटी,,,,
देशातील सौंदर्य स्थळ पहाण्याचा हक्क 
या देशातील नागरीक या नात्याने 
मलाहि मीळतो..
देखावा फुकट दाखवायचा नसेल तर तिकीट ठेवा.
मग पहायचा का नाही ते आम्ही ठरवू...
🤪🤪🤪😀

Read More ...
user avatar
Satish P
General Knowledge - 1923 msgs

*'आधार'मुळे भारताला ‘सिव्हील डेथ’चा धोका: एडवर्ड स्नोडेन*

अमेरिकेची गोपनिय माहिती लीक करणारा अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेनने ‘आधार’बाबत मोठा धोका व्यक्त केला आहे. UIDAI ने आधारच्या माध्यमातून सार्वत्रिक दक्षता प्रणाली तयार केली आहे. मात्र भारतीयांनी आधारशी सर्व काही जोडल्याने, भारताला ‘सिव्हील डेथ’ अर्थात व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका आहे, असं स्नोडेनने म्हटलं आहे.

आधार नंबरशी फोन नंबर लिंक केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्या वादाबाबत बोलताना स्नोडेनने हा धोका व्यक्त केला. स्नोडेनने त्यासाठी नुकतंचमोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झालेल्या आणि नंतर गुगलने स्पष्टीकरण दिलेल्याआधारच्या कस्टमर केअर नंबरचा दाखला दिला.

स्नोडेन म्हणाला, “यूआयडीएआयने हॅकिंगप्रकरणात ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यामध्ये फायदे कमी आणि दक्षता घेण्याच्या सूचनाच जास्त दिल्या आहेत”.

पत्रकारांनी जयपूरमध्ये आयोजिक केलेल्या एका कार्यक्रमात स्नोडेनने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. त्यामध्ये त्याने ‘आधार’बाबत आपली मतं व्यक्त केली.

“भारतातील आधारसक्ती धडकी भरवणारी आहे. कारण भारतात प्रत्येकाला आधार सक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात केली आहे की, तुम्ही तिथे बाळाला जन्म देण्यापूर्वी असो किंवा बाळाचा जन्म दाखला असो, सगळीकडे आधारसक्ती आहे”, असं स्नोडेनने नमूद केलं.

ज्या एजन्सी, संस्था आधार माहितीचा गैरवापर करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा सल्ला यावेळी स्नोडेनने दिला. शिवाय स्नोडेनने UIDAI करत असलेल्या युक्तीवादावरही टीका केली.

आधार हा एक मोठा घोटाळा आहे. त्यामुळे यूआयडीएआयने त्याबाबत योग्य त्या मार्गाने  युक्तीवाद करावा. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर खटले भरण्यापेक्षा त्यांनी सिस्टीम सुधारण्यावर भर द्यावा, असं स्नोडेन म्हणाला.

तुमचे हक्क, माहिती सुरक्षितता किंवा तुमच्या प्रायव्हसीची चिंता करु नका, असं सरकार सांगत असलं, तरी तीच मोठी फसवणूक आहे.  ही जर्मनीच्या गोबेल्स नीतीशी नातं सांगणारं आहे, असा आरोपही स्नोडेनने केला.

भारतात आज जिकडे तिकडे आधार नंबर मागितला जातो. आधारशिवाय एकही काम होत नाही.  त्यामुळे तुमचा आधार नंबर सर्वत्र पसरत असल्यामुळे हळूहळू तुम्ही प्रत्येक ठिकाणी अडकत आहात, असं स्नोडेनने नमूद केलं.

https://abpmajha.abplive.in/technology/indians-could-face-civil-death-with-aadhaar-linking-snowden-576425/amp

Read More ...
user avatar
Vinod P
General Knowledge - 5815 msgs

एक पिढी

ही पीढ़ी आता  ३५ वय ओलांडूंन ५० वयाकडे चाललीय, 'ह्या' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....

पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लेप्टोप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.

ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....

टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती. 

मार्कशीट आणि टिव्हीच्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी. 

कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी  गाडी गाडी खेळणं यात त्यांना काहीही कमीपणा वाटला  नव्हता. 

'सळई जमिनीत रूतवत जाणं' हा काही खेळ असू शकतो का ? पण होता. 

'कैऱ्या तोडणं' ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि 

कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं या मध्ये कसलेही एथीक्स तुटत नव्हते. 

मित्राच्या आईने जेवू घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी. 

वर्गात किवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचमत बोलणारी ही पिढी. 

पण गल्लीत कुणाच्याही घरात काहीही असलं तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी. 

कपील, मोहम्मद अझरुद्दीन , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते  राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख  माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी

भाड्याने VCR आणुन ४-५ पिकचर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.

लक्ष्या-अशोक च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली, हे कलाकार पाहिलेली पिढी. 

कितीही शिकलं तरी 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' यावर विश्वास असणारी

'शिक्षकांचा मार खाणं' यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण 'घरात परत धुतात' ही भावना जपणारी पिढी. 

ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी पिढी. 

वर्गात कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी.      
    कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...
ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी 

पंकज उधासच्या 'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया' या ओळीला डोळे पुसणारी, 
::
दिवाळीच्या पाच दिवसांची कथा माहित असणारी

लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.

पुन्हा डोळे झाकुया ?

दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ 

*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच 

उद्याच्या आठवणी असणार  असं मानणारी ही पिढी ?*

धन्य ते जीवन जे खर आपणच  जगलोय !!! 🙏🙏👏💐🌹👌🏻👍👆🏻

Read More ...
user avatar
Vikas G
General Knowledge - 2368 msgs

*ब्राम्हणाची मुले व बहुजनाची मुले* 
          *फरक पहा*
🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊

*ब्राह्मणांची मुले कधीही  सकाळ संध्याकाळ  नामस्मरण  करीत नाहीत*
*मनाचे श्लोक पाठ करत नाहीत* 
*अभंग  तर कधीच पाठ करत नाहीत.*
*पारायणे  करत  बसत नाहीत.*
*पंढरीची वारी करत नाहीत*
*लक्ष्मण शक्ती त पोतडे घालून फिरत नाहीत.*
*देवीची मशाल घेवून रस्त्याने धावत नाहीत.*
*गणपती बसवत नाहीत*. *बसविलाच तर एक दीवसांचा !* 
*सत्यनारायण पुजा घरी कधी करत नाही.*
*दुर्गा माता बसवत नाहीत*.
*कोणत्याही  मिरवणूकीत नाचत नाहीत.*
*नारायण नागबळी त्रिपिंडी अभिषेक* 
*शांती घालत नाहीत.*
       *ते फक्त एकच करतात*
*अहोरात्र अभ्यास करतात व* *नौकरी कशी मिळवता येईल एवढेच पहातात.* 
      *त्यांना  माहीत आहे स्पर्धा*  *परिक्षेत अभंग विचारत नाहीत* *मनाचे श्लोक विचारत नाहीत.* 
      *तिथे विचारतात फक्त* 
*जनरल नाॅलेज, विज्ञान,  संगणक*. 

*👉   म्हणून ते सर्व  क्षेत्रात आहेत*. 
*ते परदेशात आहेत*. 
*ते सनदी अधिकारी आहेत.* 
*ते न्यायालयात  आहेत*.
*ते डाॅक्टर आहेत इंजिनिअर  आहेत*
*👉   आम्ही मात्र देवदेवांत व* *कर्मकांडात भटकत आहोत*
*आपले पहा कशात आहेत*
*टर्नर ,फिटर ,पेन्टर ,क्लिनर* ,
*हमाल* *,ड्रायव्हर , वेल्डर,प्लंबर शिपाई*,  *तलाठी ,* *ग्रामसेवक , रात्री वाळु उपसायला *वॉचमन , सिक्युरीटी गार्ड,*  *चिठ्ठीवाले , मांडव बांधायला ,*  *शेळया ,  मेंढ्या, कोंबड्या* *सांभाळणारे  , पोस्टर चिटकायला , सगळंया पक्षात टाळया वाजवायला ,   शेत मजूर,ऊस तोड कामगार  हा सगळा आपलाच माल आहे*. 
       *काहीच नाही जमले तर दिंडीत नक्कीच आहे.*
      *शेतीत आहे शेती परवडत नाही.*
*गाडीवर आहे गाडी परवडत नाही.*
*आरक्षण नाही नौकरी नाही*. 
*नौकरी नाही तर छोकरी नाही*.
*अल्लख निरंजन व्हायची वेळ आली*.

*जमीन एकरा दोन एकरावर आली*
*माळवद दोन खण वाट्याला आलं*
*गावात घर नाही दारात रोजगार नाही.*
    *तरी हरीनाम सप्ताह  ,भागवत, जागरण* *गोंधळ . सत्यनारायण पुजा ,* *देवाला बकरु ,नारायण      नागबळी याचा जोर काही कमी नाही...........!*
*पण आता...*
*शिक्षण हाच एक मार्ग उरला आहे उन्नतीचा.*
*देव देव करण्यापेक्षा देवघेव (व्यवसाय ) करा.* 
*सत्यशोधक बना. अजुनही वेळ गेलेली नाही .*

  *सोडा सर्व   व्यसने,  धरा कास शिक्षणाची* *जिद्दीची  मेहनतीची , अभ्यासाची,*
*चिकाटीची तरच टिकाल काहीतरी* *व्हाल. नसता होताल बेहाल.*

*जो शिकेल तोच टिकेल*

 👉 *जया नाही शिक्षण त्याचे होईल भक्षण*
   महात्मा ज्योतिबा फुले 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Read More ...
user avatar
Vedkush P
General Knowledge - 5208 msgs

http://m.lokmat.com/national/if-you-do-not-vote-lok-sabha-election-you-will-be-deducting-350-rupees-bank-account/?fbclid=IwAR3mp0tDZUg2414biUrMDlgdNI9oBjWowcEs5-I020otIp-uGU_La9jgk1c

लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार
निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: March 21, 2019 04:05 PM | Updated: March 21, 2019 04:07 PM

लोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान न करणे महागात पडणार आहे. निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, मतदान न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आधारकार्डद्वारे होणार आहे. तर, या कार्डद्वारे लिंक असलेल्या बँकेतून 350 रुपये वजा होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यांसदर्भात सर्वच सरकारी बँकांना आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची ताकीदही सर्व बँकांना दिली आहे. आयोगच्या प्रवक्त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. देशातील सर्वच मतदारांना लक्षात घेऊनच मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात येते. त्यामुळे जे मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत, त्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेला खर्च वायपट जातो. प्रत्येकी एका मतदानासाठी आयोगाला 350 रुपये खर्च येतो. म्हणूनच, जो मतदार मतदान करणार नाही, त्या मतदाराकडून निवडणूक आयोग 350 रुपये वसुल करणार आहे. 

विशेष म्हणजे ज्या मतदारांचे बँक अकाऊंट नसेल, त्या मतदारांकडून मोबाईल फोनचे रिचार्ज करताना हे 350 रुपये वसुल केले जाणार आहेत. त्यासाठी कमीत-कमी 350 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. त्यापेक्षा कमी रकमेचा रिचार्ज फोनवरुन होणार नाही. विशेष म्हणजे, आयोगाच्या या आदेशाविरुद्ध कुणीही न्यायालयात दाद मागू नये, यासाठी अगोदरच आयोगाने न्यायालयाकडून या आदेशाची परवानगी घेतली आहे. दरम्यान, देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 7 टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. तर 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार सध्या देशात आदर्श आचासंहित लागू करण्यात आली आहे.

Read More ...
user avatar
Vanita P
General Knowledge - 2110 msgs

--------------------
 *!! कवडी !!*
-------------------------

कवडीला लक्ष्मी चे प्रतिक मानले जाते समुद्रातुन्न उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तुंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मी शी जोडला जातो. इतकेच काय तर लक्ष्मी ची पूजा करतांना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मी ची उत्पत्ति समुद्रातुन्न झालेली आहे. 

*कवड्यांचे प्रकार किती व कोणते?*
तसे पाहता बर्याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात.
परंतु पुजे मधे अथवा देवी शृंगारांमधे काही विषेश कवड्यांचा समावेश होतो.

*1)महालक्ष्मी कवडी* 
कवडीवर तपकिरी रंगाचे ठीपके.

*2)आंबिका बट कवडी*
 खडबडीत व पिवळसर रंगाची 

*3)येडेश्वरी कवडी*
 राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा 

*4)यल्लम्मा कवडी*
 शुभ्र व दुधासमान निश्कलंक 

आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात. त्या त्या देवींच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो.
------------------------------------------------------

*कवडी माळ जी आई भवानी सह अनेक देवींच्या गळ्यातील अलंकार आहे.* 

*कवडीच्या महात्म्याच्या वर्णनात एक  कथा*

शिव पार्वती भारती मठात सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले' त्यानी जगदंबा मातेच्या हातातील कवडी कडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे? जिच्या निर्णया समक्ष साक्षात महादेव हारवता आहात आपण; त्यावर महादेवीनी सारीपाटावरील एक कवडी नारदमुनिंच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणुन देण्यास सांगितले. 

नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन ईंद्र देवांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्र देवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजु घेऊन एका पारड्यात कवडी व दुसय्रा पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना. तराजु विशाल झाला कुबेरभांडार खाली झाले ; किंतु कवडी तुल्य धन होईना देवता गणांनी मनोमन क्षमा मागुन देवराज ईंद्राने स्वत:चा मुकुट देखिल पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडीतोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज ईंद्रासह सर्व देव शिव शक्ति समिप आले.अपराध क्षमापण केले. 

या अपराधाच्या क्षमापणेप्रित्यर्थ ईंद्र व चंद्र देवांनी कल्होळ तिर्थाची निर्मिती केली.

*हेच तुळजापुरातील कल्होळ तिर्थ जे ईंद्र व चंद्र देवानी बांधले असुन. ब्रम्हदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तिर्थांना ईथे येण्यास सांगितले या तिर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्होळ तिर्थ होय* 
 तेव्हापासुन कवडीला अपार महत्व प्राप्त झाले.
-------------------------------------------------
*कवडीचे अनुभवसिद्ध प्रयोग* 

१) बंध्या रुपया बरोबर ३ तपकिरि कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरित ठेवावी यामुळे लक्ष्मी आपल्या कड़े निरंतर राहील व् दरवर्षी याची लक्ष्मी पूजन च्या दिवशी याची पूजा करावी.

२) एखाद्या महत्वाच्या कामासाठी किंवा परिक्षे साठी इंटरव्यू साठी जात असाल तर घरा बाहर पड़तांना १ पांढरी कवडी उजव्या खिशांत ठेवावी कार्य यशस्वी होते .

३) नविन वाहना ला काळ्या दोर्यात ओवलेली तपकिरि कवडी दिवे लाग्निच्या वेळी बांधल्यास अपघाता चे भय राहत नाही. 

४) दुकानाच्या गल्ल्यात 
३,५,७ अश्या विषम संखेत कवडी ठेवली तर पैशाचे ओघ सातत्याने सुरु राहतो .

५) लहान बालकांना दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते त्यासाठी पांढरी कवडी काळ्या दोर्यात ओउन बांधावी

६) ज्याच्या कड़े लक्ष्मी माते ने पाठ फिरवली आहे अश्या लोकांनी ७ पांढर्या कवडी केशर मिश्रित हलदी चा लेप लावावा व् त्या नव्या कोरया पिवळ्या  कापड़ा त गुंडाळून  देवार्यात ठेवाव्या लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल 

७) काही कारणाने पति पत्नी मधे भांडण होऊंन संसार उध्वस्त होणार असेल तर २१ पांढर्या कवडी ची माळ उशी खाली ठेवावी अल्पावधित वादळ शांत होईल व् जीवन सुखी होईल. 

८) लहान मुलांना दात येताना  त्रास होत असेल तर शिंपल्यांची माळ गळ्यात घातल्याने दांत विना त्रासाने येतात......!!
-------------------------------------------------
एवढेच काय एके काळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणुन अस्तित्वात होत्या.

 राजे महाराजे कवड्यांच्या माळा परीधान करत असत. कारण कवडी ही सागरातुन निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत. 
--------------------------------------------------

आपणही कालोघात विसरलो म्हणुन की काय पण कधीतरी म्हणतोच 
" काय कवडी किंम्मत केली "
"कवडीमोल विकले गेले "

आता आराधी लोकांत कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर जे भगवतीला प्रिय ते आराध्यास प्रिय म्हणुन आराधी आजही अनमोल अशा कवड्यासाजाचा शृंगार करतात. त्यांना तो जिवापाड प्रिय आहे.
------------------------------------------------

------------------------------------------------

Read More ...
user avatar
Amod P
General Knowledge - 2111 msgs

Click on your birth month link below and read what it says about you?

January - http://bit.ly/birth-jan

February - http://bit.ly/birth-feb

March - http://bit.ly/birth-mar

April - http://bit.ly/birth-april

May - http://bit.ly/birth-may

June - http://bit.ly/birth-june

July - http://bit.ly/birth-july

August - http://bit.ly/birth-august

September - http://bit.ly/birth-sept

October - http://bit.ly/birth-october

November - http://bit.ly/birth-nov

December - http://bit.ly/birth-dec

And 
Share with all your Friends and Family..
 😇😇

Read More ...
user avatar
Presm U
General Knowledge - 4353 msgs

महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार

आपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?

मग आता पहा .............

स्थिर आकार -       मार्च - २०१७ मध्ये        रु. - ५५.००

स्थिर आकार -       एप्रिल - २०१७ मध्ये    रु. - ५९.००

स्थिर आकार -       मे - २०१७ मध्ये            रु. - ६०.००

स्थिर आकार -       एप्रिल - २०१८ मध्ये      रु. - ६२.००

स्थिर आकार -       मे - २०१८ मध्ये            रु. - ६५.००

आणि आता ऑक्टोबर - २०१८ मध्ये १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.

प्रत्येक महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात स्थिर आकार या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर - २०१८ पासून १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.

या आधी एका नवीन आकाराची भर टाकली होती त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U. त्या आकारामुळे मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून वीज वितरण कंपनी अक्षरशः आपली दिशाभूल करत आहे व आपण त्याकडे दुर्लक्ष्य करत आहोत. या विरोधात कोणी आवाज उठवेल का?

वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली वाढ आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भर पडतच राहणार आहे. 

        कृपया हा मेसेज पुढे पाठवा सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे. 

आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रात वीज दर आहेत 

० - १०० - रु  ३.००

१०१ -  ३०० - रु ६.७३  

३०१ - ५०० - रु ९.७५

तेच दिल्लीमधे 

० - २०० - रु २.०० 

२०० च्या वर - रु २.९७५ / ३.  वरुन ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५०% माफ .

म्हणजेच 

महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/- 

आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/- 

 

सिद्धार्थ साखरे, 【 सचिव 】मानवाधिकार पार्टी, दारा जनहीत मध्ये जारी, www.manavadhikarparty.com

      🔍 जागो ग्राहक जागो  🔍

Read More ...
user avatar
Vedkush P
General Knowledge - 5208 msgs
41516EFF-67E3-04B2-CF3D-C6B69BC16D24.jpg
user avatar
Aditi k
General Knowledge - 1813 msgs

Hema Malini married a married man.

Shree Devi married a married man.

Raveena Tandon married a married man.

Karisma Kapoor married a married man.

Kareena Kapoor married a married man.

Juhi Chawla also married a married man.

Vidya Balan married a married man.

Sonam Kapoor married a married man.

Lara Dutta married a married man.

Shilpa Shetty married a married man.

Mahima Chaudhary married a married man.

Amrita Arora also married a married man.

Rani Mukherji married a married man.

Bipasha Basu also married a married man.

Sarika married a married man.

Shabana Azmi also married a married man.

Kalki koechlin also married a married man.

Smita Patil also married a married man.

Married Men...smile!
...experience counts. 

Second hand husbands are in high demand. 

So you could still have a chance to be Happy.


 😂😂😃😃😍😍

Read More ...
user avatar
Sandhya D
General Knowledge - 1757 msgs

लेखांक-३१                               १०/९/२०१८
रेफ्रिजरेटर ची वास्तविकता
डॉ राजीव दीक्षित ह्यांच्या संशोधनावर आधारित.
     फ्रिज चा अविष्कार कुठे व का झाला ते पाहुयात.
     युरोप,अमेरिकेत तापमान -४०ते+१५ डिग्रीपर्यंत पर्यंत असतं. तिथे भाज्या,फळे,धान्य वर्षभर पिकत नाहीत. ८-८महिने सूर्यप्रकाशही दिसत नाही.ऊनही पडत नाही. त्यामुळे अन्नपदार्थ टिकवण्यासाठीच्या गरजेतून फ्रिजचे संशोधन झाले. जिथे विशिष्ट तापमानात अन्नपदार्थ व औषधांचा साठा करता येईल हा हेतू होता. तसेच तिथे रोज जेवणही बनवत नाहीत. आठवड्यातून एकदाच बनवतात व नंतर गरम करून करून खातात अशी संस्कृती आहे.
     फ्रिजमधून १२प्रकारचे CFC विषारीवायु बाहेर पडतात.
     फ्रिज व एअर कंडिशनर निसर्गाच्या विरोधात तापमान कमी करतात.त्यामध्ये क्लोरीन, फ्लोरिन व कार्बन हे 3अतिशय विषारीवायू बाहेर पडतात. ह्या तीन वायूंच्या संयोगाने१२प्रकारचे विषारीवायु तयार होतात.फ्रिज मध्ये ठेवलेलं अन्न-पाणी ह्या  विषारी CFC वायुंच्या प्रभावामध्ये येते.अन्न झाकून ठेवले तरी ह्या वायूंचा दुष्परिणाम होतोच.हळूहळू ह्या विषाचा परिणाम शरीरावर होतो.
भारतात फ्रिज चा प्रवेश कसा झाला?
     अमेरिकन Calvinator कंपनीने फ्रिज भारतात आणला.अमेरिका, यूरोप मध्ये CFC वायूचे प्रमाण खूप वाढले.परिणामी ओझोन कमी झाला. वातावरणात ओझोन योग्य प्रमाणात नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही. सूर्यप्रकाशात अतिप्रखर अशी ultraviolet किरणे असतात, जी ओझोन वायूच्या स्तरातून सृष्टिमध्ये प्रसारित होतात त्यामुळे ती सुसह्य होतात. ही अतिप्रखर किरणे प्रत्यक्ष त्वचेवर पडली तर त्वचा जळते,करपते, त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. फ्रिज, एअरकंडिशन मुळे CFC वायु मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो. ह्या वायूमुळे ध्रुवीय देशांतील ओझोन कमी झाला. तिथे उष्णता वाढली. बर्फ वितळला. नदीच्या पाण्याची पातळी वाढली.पूर येऊ येऊ लागले. CFC चे प्रमाण वाढल्याने पुरसमस्या निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी वातावरणातील CFC चे प्रमाण कमी करण्याचे ठरविले.पण फ्रिज, एअरकंडिशनसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा कमी होउ नये म्हणून त्यांचे आगमन आशियाई देशात झाले.जाहिरातींचा योग्य तो परिणाम भारतीयांच्या मानसिकतेवर झाला व घराघरात देव्हाऱ्याप्रमाणेच फ्रिजसाठी जागा झाली.
     परिग्रह अर्थात साठा करणे.परदेशात साठा करणे गरजेचे होते त्यासाठी फ्रिजचा शोध लागला. परंतु संपन्न भारतात तर संपूर्ण वर्षभर दररोज भाज्या,फळे,दूध,पाणी इ.सर्वच अन्नपदार्थ सहज प्राप्त होतात. फ्रिज घरात आल्याने आपणही साठा करू लागलो. अगदी पाणी सुद्धा साठवू लागलो. भाजी आधीच चिरून ठेवू लागलो.मळलेले कणिक ही ठेवू लागलो.सर्वच अन्न दूषित झाले.
     वातावरणात ही CFC चे प्रमाण वाढले.ओझोन कमी झाला.उष्णता वाढली. फ्रिजमधील अन्नघटक आपल्याला टवटवीत जिवंत वाटतात.परंतु गाराव्यामुळे पदार्थातील निसर्गतः असलेली ऊर्जा कमी होते.पदार्थातील अग्नीतत्व कमी झालेले असते. पदार्थ जिवंत असल्याचा भास होतो.
     अपरिग्रह ही अष्टांगयोगाची एक पायरी आहे. फ्रिजमुळे आपण गरज नसताना अन्नपदार्थांचा साठा करू लागलो. त्यामुळे नकळत दोषांचा साठा शरीरात होऊ लागला व आजार वाढले. थोडेसे अंतर्मुख होऊयात, की खरंच फ्रिजची वास्तविक गरज आपल्याला आहे का? त्यानुसार आपल्या आरोग्यासाठी योग्य पावले उचलूयात.
धन्यवाद,
वैद्य मनिषा शिवाजी निकम
पांचभौतिक आयुर्वेद चिकित्सक,मुंबई.
manisha.nikam1903@gmail.com

Read More ...
user avatar
Raju H
General Knowledge - 2687 msgs

खुप दुर्मिळ माहिती

इ.स. १८७१ साली ब्रिटिशांनी, पुणे शहरात ५१२ एकर जागेवर बांधलेला चिरेबंदी वाडा म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
या वाड्यात शेकडो खोल्या असून येथे देशातील व परदेशातील मिळून ५००० माणसे अत्यंत 'गुण्यागोविंदाने' व 'निरपेक्ष' वृत्तीने राहतात.
येथील वैशिष्ट म्हणजे, वाड्यातील सर्व कामे पुरूष मंडळीच करतात. 
येथे सर्वांसाठी एकच स्वयंपाक असतो. वाड्यात जात-पात, धर्म-पंथ, ज्ञानी-अज्ञानी, गरीब-श्रीमंत; यांचे बंधन नाही, भेदभाव नाही. इतकेच काय, पण येथे स्थळ-काळ-वेळ याचेही भान राहत नाही.
वाड्यात सर्व प्रकारचे शिक्षण, कला शिकवल्या जातात. हे एक प्रचंड असे विद्यापीठ आहे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणासही बाहेर जाण्याची परवानगी नाही. येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक लोक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री झालेत. काहीजण थोर समाजसेवक तर काही उद्योगपती झाले. पुढील आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याचे शिक्षण येथे दिले जाते.

वाड्याचे नाव आणि पत्ता :
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
--
-
--
--
येरवडा मध्यवर्ती कारागृह,
येरवडा, पुणे - 6

😂😂😂

Read More ...
user avatar
Vedkush P
General Knowledge - 5208 msgs

कोरोना वॅक्सिन साठी आलेला फोन उचलू नका. रजिस्ट्रेशनच्या  नावाखाली तुमचा आधार कार्ड नंबर मागणार नंतर सांगणार ओ टी पी दिला की तुमचे नाव रजिस्टर होईल. पण चुकूनही अजिबात माहिती सांगू नका. नाहीतर तुमचे बँक बॅलन्स खाली झाले म्हणून समजा. सावध राहा आणि काळजी घ्या. 
मुंबई पोलीस( महाराष्ट्र )

Read More ...
user avatar
Presm U
General Knowledge - 4353 msgs

महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार

आपण कधी वीज बिल बारकाईने पाहता का ?

मग आता पहा .............

स्थिर आकार -       मार्च - २०१७ मध्ये        रु. - ५५.००

स्थिर आकार -       एप्रिल - २०१७ मध्ये    रु. - ५९.००

स्थिर आकार -       मे - २०१७ मध्ये            रु. - ६०.००

स्थिर आकार -       एप्रिल - २०१८ मध्ये      रु. - ६२.००

स्थिर आकार -       मे - २०१८ मध्ये            रु. - ६५.००

आणि आता ऑक्टोबर - २०१८ मध्ये १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.

प्रत्येक महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात स्थिर आकार या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर - २०१८ पासून १५.०० रु. ची वाढ करून ८०.०० रु. केला आहे.

या आधी एका नवीन आकाराची भर टाकली होती त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U. त्या आकारामुळे मागील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून वीज वितरण कंपनी अक्षरशः आपली दिशाभूल करत आहे व आपण त्याकडे दुर्लक्ष्य करत आहोत. या विरोधात कोणी आवाज उठवेल का?

वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली वाढ आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भर पडतच राहणार आहे. 

        कृपया हा मेसेज पुढे पाठवा सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे. 

आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रात वीज दर आहेत 

० - १०० - रु  ३.००

१०१ -  ३०० - रु ६.७३  

३०१ - ५०० - रु ९.७५

तेच दिल्लीमधे 

० - २०० - रु २.०० 

२०० च्या वर - रु २.९७५ / ३.  वरुन ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५०% माफ .

म्हणजेच 

महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/- 

आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/- 

 

सिद्धार्थ साखरे, 【 सचिव 】मानवाधिकार पार्टी, दारा जनहीत मध्ये जारी, www.manavadhikarparty.com

      🔍 जागो ग्राहक जागो  🔍

Read More ...
user avatar
Nilesh N
General Knowledge - 2569 msgs

30 आँक्टोबर  दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘सिधुदूर्ग’ चा गौरव होणार आहे.

संपूर्ण देशात स्वच्छतेत पहिला क्रमांक सिंधुदूर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. 
 
सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या सर्वे मध्ये देशात प्रथम .......
" आपले कोकण अनेक विषयात देशात आणि जगात पहिले आहे " .

* येथील माणसांची जीवन पद्धती 
* निसर्ग आणि मानवी जीवनाचा समतोल 
* नैसर्गिकपणे पर्यावरणा विषयक आवड 
* शून्य हुंडा बळी 
* शून्य भिकारी 
* शून्य स्त्री भ्रूण हत्या 
* शून्य कर्जबाजारीपणा
* शून्य शेतकरी आत्महत्या 
* शून्य सरकारी निधी व कर्ज डुबवणे 
* गेली 5 वर्षे सतत ssc/hsc बोर्ड महाराष्टात प्रथम .

गावात राहाणाऱ्या व देशात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या सिंधूदुर्गवासियांचा सर्वाना अभिमान आहे हा गौरव बघावा 30 ऑक्टोबर ला दिल्ली मधे ....
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

** हा msg  सर्व कोकणवासीयांना पाठवा.**

Read More ...
user avatar
Suyog M
General Knowledge - 2194 msgs
A4475335-C1C5-5039-BE0D-D36E37071392.jpg
user avatar
Vishal H
General Knowledge - 3246 msgs
CCF0AC0B-1A82-F165-4B9B-9192B3CC5B20.jpg

This still image was created by a japanese neurology professor Yamamoto, and he told the instructions below: If its not moving, or just moving a little, you are healthy and has slept well. If its moving slowly, you are a bit stressed or tired If its moving continously, you are over-stressed and might have mental problems.

user avatar
Kishor B
General Knowledge - 2827 msgs
03E26D7D-0FA9-7936-E36B-EEF9FBF24EB8.jpg
user avatar
Yogesh M
General Knowledge - 2119 msgs

🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃❌
*कोंकण रेल्वेची स्टेशन आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक*
कोलाड,०२१९४-२५००८३
माणगाव,०२१४०-२६३२३०
वीर,०२१४५-२७००५५
करंजाडी,०२१४५-२७२०४४
दिवाणखवटी,०२३५६-२६३०२१
खेड,०२३५६-२६३५९८
अंजनी,०२३५६-२६३८७०
चिपळूण,०२३५५-२५६३७६
कामथे,०२३५५-०५४३५२
सावर्डा,०२३५५-२६४०८२
आरवली रोड,०२३५४-२४४८२४
संगमेश्वर,०२३५४-२५२२३७
उक्शी,०२३५४-२४६२४६
भोके,०२३५२-२४६२२२
रत्नागिरी,०२३५२-२२८९५१
निवसर,०२३५२-२४५२१९
आडवली,०२३५१-२३०१८३
विलवडे,०२३५१-२३६०१६
राजापूर रोड,०२३५३-२२१२२०
वैभववाडी रोड,०२३६७-२५५७२६
नांदगाव रोड,०२३६७-२४८५०९
कणकवली,०२३६७-२३२२४३
सिंधुदुर्ग,०२३६२-२२८७७५
कुडाळ,०२३६२-२२२६०४
सावंतवाडी रोड,०२३६३-२५८३१५
पेडणे,०८३२-२२०१२८३
थिवी,०८३२-२२९८६८२
करमली,०८३२-२२८५७९८
वेर्णा,०८३२-२७५४२८९
माजोर्डा,०८३२-२७९०९०२
मडगाव,०८३२-२७०३९५०
बाळ्ळी,०८३२-२६७०२७०
काणकोण,०८३२-२६४३६४४
अस्नोटी,०८३८२-२६६३६०
कारवार,०८३८२-२८२३७०
हारवाड,०८३८८-२४८३७७
अंकोला,०८३८८-२३०६८०
गोकर्ण रोड,०८३८६-२७९४८७
कुमठा,०८३८६-२२३८२०
होन्नावर,०८३८७-२३६१८९
मंकी,०८३८७-२५७३३३
मुरुडेश्वर,०८३८५-२६८७८८
भटकळ,०८३८५-२२३७९१
शिरूर,०८२५४-२५३१९२
बिजूर,०८२५४-२५६४६१
सेनापूर,०८२५४-२७९२१४
कुंदापूर,०८२५४-२३७३६५
उडपी,०८२०-२५२४३५१
बरकुर,०८२०-२५८७४१९
पडूबिद्री,०८२०-२५४०२७९
मुल्की,०८२४-२२९०८३८
सुरतकल,०८२४-२४७५९३८
थोकुर,०८२४-२४०८६०५
🚂🚃🚃🚃🚃🚃🚃

Read More ...
user avatar
Santosh T
General Knowledge - 1964 msgs

पितृपक्ष महालयारंभ माहिती:-

आज पासून पितृपक्षाचा प्रारंभ होतो. वास्तविक हा काळ आपल्या तीन पिढय़ातल्या पितरांच्या आपल्या निवासस्थानी आगमनाचा व वास्तव्याचा समजला जातो. त्यामुळे तो शुभदायी असतो. आपल्या अपरोक्ष आपल्या पुढच्या पिढय़ांनी केलेल्या प्रगतीचे दर्शन घेऊन पितरांचे हे आत्मे या पिढय़ांना शुभाशिर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे. असे असतानाही हा काळ हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही नवकार्याच्या शुभारंभासाठी अशुभ मानला जातो. या काळात कोणत्याही नवकार्याचा, खरेदीचा आरंभ न करण्याची परंपरा आहे. परंतु ती चुकीची आहे. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ आपण ज्येष्ठांच्या वंदनेने आणि आशिर्वादाने करीत असतो. असे वंदनीय ज्येष्ठ आत्मरुपाने ज्या काळात आपल्या निवासस्थानी येतात, आशिर्वाद देतात तो काळ अशुभ कसा असू शकेल, असा नवा विचार सध्या रुढ होतो आहे. त्याची ही कहाणी.

आपल्या भारतीय संस्कृतीत पितृपक्षाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आजवर या पितृपक्षाला अशुभ मानले जात होते. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ या काळात करू नये असा समज रुढ होता. परंतु बदलत्या काळासोबत ही संकल्पना आता बदलते आहे. त्यामुळे मोठी खरेदी अथवा व्यवहार किंवा शुभकार्ये हे आता या काळात पार पाडले जाऊ लागले आहेत. पितृपक्षाचा संबंध यमाशी तसेच मृत्यु पावलेल्या पूर्वजांशी असल्यामुळे तो अशुभ समजला जात असे. परंतु धर्मशास्त्राने मात्र असे सांगितले आहे की, उलट किमान तीन पिढय़ांचे पूर्वज त्यांच्या सध्याच्या पिढय़ांच्या निवासस्थानी स्वर्गलोकात जाण्यापूर्वी आत्मारुपाने येत असतात. त्यांची प्रगती पाहून समाधानी होत असतात. त्यांना सुख, समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद देत असतात. अशा काळाला अत्यंत शुभ मानले पाहिजे. त्यामुळेच या काळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलतो आहे. पितृपक्षाला पितृपक्ष, पित्तरपाटा, श्राद्धपक्ष, हडपक्ष, पित्रीपोखो, सोळाश्राद्ध पक्ष, कणागत, जतीया, महालया पक्ष आणि अपारा पक्ष अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हा पितृपक्ष सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या दरम्यान असतो. अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशीपासून तो सुरू होतो आणि सर्वपित्री अथवा महालया अमावस्येच्या दिवशी तो संपतो. या पर्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सूर्याचे संक्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे होते. हिंदू संस्कृतीतील धर्मशास्त्रानुसार अशी श्रद्धा आहे की, कोणत्याही परिवारातील दिवंगत झालेले तीन पिढय़ांचे पूर्वज हे पितृलोकात जातात. या लोकावर यमराजाची सत्ता असते. ज्या वेळेला चौथ्या पिढीतील एखादा पूर्वज देहांत झाल्यानंतर पितृलोकात जातो तेव्हा त्याच्या पहिल्या पिढीतील जो पूर्वज पितृलोकात असतो तो स्वर्गलोकात जातो. याचे कारण फक्त तीनच पिढय़ातील पूर्वजांना पितृलोकात स्थान असते. याच काळात सूर्य तुला राशीत प्रवेश करतो. या काळामध्ये अशी श्रद्धा आहे की, आपले जे पूर्वज पितृलोकातून स्वर्गलोकात जाणार असतात ते पितृपक्षाच्या प्रारंभी आत्मारुपाने पृथ्वीवरील आपल्या परिवाराच्या निवासस्थानी येतात आणि सर्वपित्री अमावस्येपर्यंत तिथे वास्तव्य करतात व त्यानंतर सूर्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला की, स्वर्गलोकात प्रवेश करतात. परंतु स्वर्गलोकात त्यांचा प्रवेश होण्यासाठी अशी अट आहे की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात आपल्या पितरांना व त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्राद्धविधीच्या रुपाने अन्नदान केलेले असले पाहिजे किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अन्नदान केलेले असले पाहिजे. ही अट किती कठोर आहे याची एक कथा आपल्या महाभारतात सांगितली आहे. ज्यावेळी महाभारताच्या युद्धात कर्णाचा मृत्यू झाला व त्याच्या आयुष्यभरातील पुण्यकृत्यामुळे तो स्वर्गवासाला पात्र ठरला. परंतु स्वर्गाच्या द्वारापाशी त्याला अडवले गेले. तू आयुष्यात सोने, चांदी, हिरे, माणके, एवढेच नव्हे तर स्वतःची कवचकुंडलेही तू दान केलीस. परंतु या दानाचा स्वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी उपयोग होणार नाही. कारण तू तुझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही स्वरुपात अन्नदान केलेले नाही तसेच पितरांना श्राद्धविधीच्या रुपाने अन्नदान केलेले नाही. त्यामुळे तुला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यावर कर्णाने यमराजांना सांगितले की, मला याची माहिती नव्हती. त्यामुळे माझ्याकडून हा प्रमाद नकळत झाला आहे. यावर मला उपाय सांगा. तेव्हा यमराजांनी आणि चित्रगुप्तांनी कर्णाला पुन्हा 15 दिवस पृथ्वीवर पाठविले आणि या काळात कर्णाने अन्नदान केले तसेच आपल्या पूर्वजांच्या स्मृत्यर्थ श्राद्धविधी केले. त्यानंतर कर्णाला स्वर्गात प्रवेश मिळाला. स्वतः कर्ण सूर्यपुत्र होता. यमराजही सूर्यपुत्र होते. तरीही त्यांच्यातले हे नाते या नियमावर मात करू शकले नाहीत. एवढा हा नियम कठोर आहे. कर्ण ज्या काळात म्हणजे पंधरवडय़ात पुन्हा पृथ्वीवर आला होता तो काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.

पितृपक्षामध्ये प्रत्येक पितराचे स्थान एकाएका तिथीसाठी निश्चित केलेले आहे. त्यानुसार पूर्वजाला ज्या रितीने मृत्यू आलेला असेल त्यानुसार या तिथी ठरलेल्या आहेत. जे पूर्वज गतवर्षी निधन पावले आहेत त्यांच्यासाठी पितृपक्षातील चौथी भरणी आणि पंचमी भरणी निश्चित केलेली आहे. सौभाग्यवती असताना ज्या स्त्री पूर्वज निधन पावल्या त्यांच्या श्राद्धासाठी अविधवा नवमी निश्चित केलेली आहे. त्यांच्या श्राद्धासाठी सवाष्ण भोजनासाठी बोलविण्याची प्रथा आहे. कुमारवयात ज्यांचे निधन झाले अशा मुलांच्या श्राद्धासाठी द्वादशी ही तिथी आहे. शस्त्र अथवा अपघात किंवा युद्ध यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पूर्वजांसाठी घट चतुर्दशी किंवा घायल चतुर्दशी ही श्राद्धासाठी निर्धारित केलेली आहे. याशिवाय ज्यांना या तिथींना आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करता आले नाही त्यांना ही संधी मिळावी यासाठी सर्वपित्री अमावस्या ही तिथी योग्य मानली गेली आहे. त्या तिथीला कोणत्याही पूर्वजाचे श्राद्ध केले तरी चालू शकते.

हिंदू संस्कृतीत असे मानले गेले आहे की, आपल्या पूर्वजांचे श्राद्ध प्रतिवर्षी करणे म्हणजेच त्यांच्यासाठी स्वर्गाचे द्वार खुले करणे. त्यांना स्वर्गात जागा मिळवून देणे. ज्यांच्या पुढील पिढय़ा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करीत नाहीत त्या पूर्वजांना पितृलोकातच म्हणजे यमलोकातच राहावे लागते. म्हणूनच पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध घालणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अन्नदानासोबत वस्त्रदान, सुवर्णदान, धातूदान, पशूदान, गो-दान अशी अनेक दानेही केली जातात. आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाणारे मार्कंडेय पुराणात असे सांगितले आहे की, पितृपक्षात प्रत्येक घरात त्यांच्या पितरांचे आत्मे, तसेच त्यांच्या कुलदेवता आणि भूतलोकातील आत्मे हे पाहुणे म्हणून येत असतात. घरामध्ये पूर्वजांचे श्राद्ध यथासांग झाले तर ते आपल्या त्या घरातील सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि शांतता याचे आशीर्वाद देतात व स्वर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करतात.

बंगालमध्ये मात्र पितृपक्षाचे स्वरुप थोडे वेगळे आहे. तेथे दुर्गापूजा उत्सवाचा शुभारंभ महालया अमावस्येला होतो. बंगाली संस्कृतीची अशी श्रद्धा आहे की, याच दिवशी देवीने दानवांच्या निःपातासाठी पृथ्वीवर अवतार घेतला. त्या दिवशी बंगाली घराघरात देवीच्या स्तोत्रांचे पाठ केले जातात व त्यानंतर पूर्वजांचे श्राद्ध केले जाते.

हिंदू संस्कृतीत असे म्हटले आहे की, कोणत्याही श्राद्धविधीसाठी गया हे शहर अत्यंत पुण्यकारक आहे. परंतु प्रत्येकाला तेथे जाऊन आपल्या पितरांचे श्राद्ध करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केले तर ते गया येथे केलेल्या श्राद्धाइतके पुण्यप्रद ठरते. श्राद्धविधी हा दुपारी व एखाद्या नदीच्या किनारी करावा असा संकेत आहे. नदी नसेल तर तळ्याच्या किनारी करावा आणि तेही शक्य नसेल तर आपल्या घरी तो करावा. श्राद्धाचा विधी हा पूर्वजांच्या ज्येष्ठ पुत्राने अथवा नातवाने करावा, असा संकेत आहे. याचा अर्थ ज्यांना पुत्र नाही त्यांचे श्राद्ध होत नाही असे नाही. तर हा श्राद्धविधी त्यांच्या मोठय़ा कन्येच्या मोठय़ा अथवा धाकटय़ा मुलाने किंवा मोठय़ा बंधूच्या मोठय़ा अथवा छोटय़ा मुलाने केला तरी चालू शकतो.

श्राद्धविधीसाठी वरण-भात, पुरी, भजी अथवा वडे, कढी, चटणी, कोशिंबीर, रव्याची खीर अथवा तांदळाची खीर किंवा लापशी, सर्वसाधारण भाज्या असा स्वयंपाक असतो. ज्याचे श्राद्ध घालायचे आहे त्याच्या आवडीनुसार या पदार्थांमध्ये बदल केला जाऊ शकतो. श्राद्धविधी हा पुरोहिताच्या मार्गदर्शनाखालीच पार पाडावा लागतो. त्यामध्ये दर्भ, काळे तीळ आदी बाबींचे महत्त्व मोठे असते. पिंडदान हा देखील यातला महत्त्वाचा विधी असतो. पिंडाला कावळा शिवल्याशिवाय श्राद्धविधी पूर्ण होत नाही. श्राद्धविधीमध्ये यम, विष्णू आणि शंकर या तीन देवतांची पूजा केली जाते. कावळा हा यमराजाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्याने पिंडाला स्पर्श केला, त्यातील अंश भक्षण केला की श्राद्ध पितरांपर्यंत पोहोचते अशी हिंदूंची श्रद्धा आहे.

पितृपक्षाचा हा सगळा पौराणिक महिमा पाहिला की, नव्या पुरोगामी विचारसरणीनुसार व वेद आणि पुराणे यांच्या नवमतवादी विचारानुसार पितृपक्ष हा देखील आता शुभकार्यासाठी अनुरूप मानला जाऊ लागला आहे. ज्या काळात आपल्या निवासस्थानी आपल्या पितरांचे आत्मारुपाने आगमन झालेले आहे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्या काळात शुभकार्याचा आरंभ करणे हे त्यामुळेच योग्य मानले जाते आहे.

नोटः- ज्यांना वडिल नाही अश्यानी आपल्या वडिलांसाठी प्रत्येक अमावस्याला उपवास करावा

Read More ...
user avatar
Presm U
General Knowledge - 4353 msgs
60069470-82FF-8791-3D30-E10D0CF8E707.jpg
user avatar
Shalan M
General Knowledge - 2307 msgs

*पक्षी मरतांना कुठे जातात?*

नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा मी केलेला अनुवाद

प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर बसुन नेहमीप्रमाणे आजुबाजुच्या घनदाट वटवृक्षांवर  चिवचिवाट करणार्‍या माझ्या सोयर्‍यांना ऐकत होतो. सर्वच जण तिथे कायमचेच रहिवासी होतो. माझी सकाळ आणि त्यांचे वटवृक्षांमधुन चिवचिवणे हा दररौजचा उपक्रम. त्या दिवशी मात्र माझ्या मनात माहित नाही पणगेली कित्येक वर्षे मी या माझ्या मित्रांना चिवचिवाट करतांना, भांडतांना ,मारामार्‍या करतांना बघीतलेय पण आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या काँलनीच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही. हा एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षि आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.
 मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गीक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मी गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दीले नाही. अनेक पक्षी निरिक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही.

आणि मग ह्या प्रयत्नातच मला एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds"
ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दीलेय की कुणीही जगात नैसर्गीक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीहि स्विकारलेले नाही. लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दीलिय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,
पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतित ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात. 
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जिवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समिप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गीक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. यावरुन बीशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रीय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जिवनकाल संपत आलाय. आणि ही जाणिव हौताच पक्षि आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही तो पर्यत ते वरती वरतीचचढत जातात. बीशप ची ही थेअरी मला तरी स्विकारार्ह वाटते  कारण दूसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजुनपर्यत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडुन कुठलेही खंडन झालेले नाही. ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणु शकतो की पक्षी मानवापेक्षा  उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव  होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवु शकतो की त्याने खूप जगुन झालेय,बघून झालेय आणि तो आनंदाने कसलिही खंत चिंता न बाळगता उंच उडून  शरीराचे  विघटन करुन टाकतो.न वयानूसार येणार्‍या व्याधी,न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सिमा नाही , पासपोर्ट नाही, पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्विकारणारी. आणि स्वतःच्या मृत्युची वेळ पण स्वतःच निश्चित करणारी... मोक्ष अजुन काय वेगळा असतो?

Read More ...
user avatar
Anand M
General Knowledge - 2293 msgs

Open Challenge 4 u.

Yeh 6 chiz hai jo hum roz dekhte hai
.      
Spelling thik karke Batao

               1. Pturecmo
               2. bokeacfo.             
               3. ihbugtlet
               4. tpsasurl
               5. irmror
               6. Lebomi

                      Lets Check Ur Brain how its work.
Time limit 24 Hrs.

Read More ...
user avatar
Nilesh P
General Knowledge - 2038 msgs

नक्की वाचा अभिमान होईल बौध्द आसल्याचा.. 
🔹"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर,

     -:१५ ऑगस्ट १९४७ रोजी
देश स्वतंत्र झाला.
२६ जानेवारी,१९५० रोजी
देशाचे बारसे करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून,
बुद्धांच्या देशाला
सम्राट अशोकाच्या देशाला
नव्या रुपात
घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
जगासमोर मांडले.

भारताची जी ओळख
जगाला ठाऊक होती,
तीच ओळख
भारतीय संविधानाने
जगासमोर पुनर्स्थापित केली.

आपल्या देशाची संपूर्ण ओळख,
बुद्ध धम्माची ओळख झाली.
उदा...

🔵*बुद्ध धम्माचे प्रतिक
आकाशी निळ्या रंगाला
राष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली,

🌷*धम्माचे प्रतिक
कमळाचे फूल
आपले राष्ट्रीय फूल झाले,

🌳*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षाला
राष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली.
*बुद्धधम्माच्या धम्मचकाला
राष्ट्रीय चिन्ह घोषित करुन
राष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यात
आले.

*सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ
येथील चारसिंह ही राजमुद्रा,
भारताची राजमुद्रा घोषित झाली.

*समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्त्व
भारतीय संविधानाचे तत्त्व
म्हणून स्विकारण्यात आले,

*`सत्यमेव जयते'हे
सम्राट अशोकाचे घोषवाक्य,
भारतीय शासनव्यवस्थेचे
ब्रीद वाक्य म्हणून मानांकीत झाले.

एवढेच नाही तर
आपल्या देशाची प्रत्येक ओळख ही
बौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली.

*आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातील
सर्वात पहिला रंग ज्याला आपण
लाल, केशरी, भगवा, लाल, नारंगी म्हणतो.
त्या रंगाला
भारतीय घटनेचे एका विशेष नावाने
वर्णित केले आहे.
इंग्रजीत त्याला
`ओशर'असे नाव आहे.
ओशर म्हणजे-
लालसर पिवळ्या मातीचा रंग,जो
बौद्ध भिक्षुंच्या चिवराचा रंग असतो.
चिवर हे बौद्ध भिक्षुंचे वस्त्र आहे.
जे त्यागाचे प्रतिक आहे.

*दुसरा रंग पांढरा
ज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे.
पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना पांढरे वस्त्र परिधान करतात.

*तिसरा रंग हिरवा जो
निसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा बुद्ध धम्माचा
पंचशीलेची शिकवण देणारा रंग
व

*तिरंग्याच्या मधोमध
बुद्ध धम्मतेचे प्रतिक
निळे धम्मचक आहे.
जे
सार्‍या विश्वाला
बुद्ध धम्माची ओळख देते.

असा सर्वांगीण बुद्ध
धम्माची प्रचिती देणारा
आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा,
राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
देशाला बहाल केला.

भारताच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे नावही
बुद्ध धम्माशी संबंधित आहे.

*`भारतरत्न'
रत्नही बुद्ध धर्माची पदवी.
बुद्ध, धम्म, संघ
म्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न.
बुद्ध धर्मात
सर्वश्रेष्ठ व्यक्तीला"रत्न"
ही पदवी बहाल केली जाते.
अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावात
रत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो.
उद...भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते शांतीरत्न वगैरे.
रत्न ह्या महान शब्दाचा
बाबासाहेबांवर खूप प्रभाव होता.
बाबासाहेबांनी आपल्या एक
लाडक्या मुलाचे नावदेखील रत्न
शब्दांशी संबंधित राजरत्न ठेवले होते.
त्या रत्न महान शब्दावरुनच
देशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे
नाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे.
त्या पुरस्काराचे
चिन्ह स्वरुप देखील
बुद्ध धम्माशी निगडीत आहे.
बोधीवृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान,
ज्यावर
पुरस्कार स्विकारणाऱया व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जाते
व दुसऱया बाजूला
चार सिंह ही राजमुद्रा
व धम्मचक असते.

*बुद्ध धम्माचे
मैत्री, प्रेम व करुणेचे प्रतिक असलेल्या कमळाचे फुलाला
घटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची मान्यता दिली.
थायलंड, श्रीलंका, बर्मा इ.
बौद्धराष्ट्रात भगवान बुद्धांच्या चरणी
कमळाचे फूल अर्पण करतात.

कमळाच्या फुलाला
पाली भाषेत `पदम'असे म्हणतात.

*भारतरत्न पुरस्काराच्या
खालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत,त्या पुरस्कारांची नावे
पद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते,
कमळाच्या एका बाजूस
पद्म व दुसऱया बाजूस
विभूषण, भूषण किंवा श्री
लिहिले असते.

*युद्ध शौर्यातील
तीन प्रमुख पुरस्कार
परमवीर चक व वीरचक
या पुरस्कारांवर देखील
कमळाचे फूल प्रामुख्याने असते.

*युद्ध शौर्यातील
प्रमुख पुरस्काराचे नाव
अशोक चक्र आहे.

*भारताच्या राष्ट्रपती भवनातील
प्रमुख दिवाणखान्याचे नाव
अशोक हॉल आहे.

*आपल्या केंद्रियमंत्री मंडळाच्या
निवासस्थान परीसराचे नाव देखील
बुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे.
सम्राट अशोकाच्या
मंत्री मंडळाच्या नगरीचे नाव
जनपथ होते.
तेच जनपथ नाव आपल्या
केंद्रिय मंत्री निवास स्थानाचे आहे.
उदा... ७ जनपथ,१० जनपथ,११ जनपथ.

अशी
भारताची ओळख असणाऱया
प्रत्येक गोष्टीचा
बुद्ध धम्माशी संबंध आहे.
बुद्ध संस्कृतीशी नातं आहे.
घटना समितीच्या सदस्यांपैकी
प्रत्येकाने ती मान्य केली.
कारण ते सत्य आहे आणि
जे सत्य असते ते
कधीच अमान्य होऊ शकत नाही.

अशाप्रकारे बाबासाहेबांनी
सर्व भारत बौद्धमय केला.
हा

बुद्ध धम्माचा विजय.
सम्राट अशोकाचा विजय.
बोधीसत्व भारतरत्न
डॉ. बाबासाहेबांचा विजय.
हाच
भारतीय संविधानाचा विजय.
💐🙏जय भीम.🙏💐
"आवडल्यास पुढे शेयर करा"

Read More ...
user avatar
Nilesh N
General Knowledge - 2569 msgs

```
अमेरिकेला English मध्ये America
म्हणतात.

जपानला पण English मध्ये Japan
म्हणतात.

भूतानलाही English मध्ये Bhutan
म्हणतात.

श्रीलंकेलाही English मध्ये
Sri Lanka च म्हणतात.

बांग्लादेशला पण English मध्ये
Bangladesh म्हणतात.

नेपाळला English मध्ये Nepal च
म्हणतात.

इतकेच काय
आपल्या जवळच्या पाकिस्तानला
English
मध्ये Pakistan च म्हणतात.

पण मग भारतालाच English मध्ये
India का म्हणतात?
तर
Oxford Dictionary नुसार

India हा शब्द
कसा आला याची ९९%
लोकांना माहिती सुद्धा नाही...

I - Independent

N- Nation

D- Declared

I - In

A- August

म्हणून इंडिया (India)
हे नाव
Dr.B.R Ambedkar यांनी दिले आहे


ह्या पोस्टला कृपया इतके शेयर
करा की, जास्तीत जास्त
भारतीयांना हे कळेल...```

 👌👍👏👏👏👏👏👏👏

Read More ...
user avatar
Ganesh J
General Knowledge - 2094 msgs
224FFB68-06A5-E2E9-0314-18D232652317.jpg
user avatar
Jaggu k
General Knowledge - 2880 msgs

🚩🚩छत्रपती संभाजी राजे..🚩🚩

वजन - 220 किलो
ऊंची - 7 फुट 8 इंच
जेवण - 35-40 भाकरया दिवसातून दोनदा
तलवारीचे वजन - 65किलो
पराक्रम - 203 युद्ध लढले एकही न हरता
सर्वात मोठे युद्ध- समोर शत्रूचे 5 लाख सैन्य
उभे व आपले सैन्यबळ फ़क्त 37 हजार असून
सुद्धा स्वराज्याला विजय प्राप्त करून देणारा एकमेव शुर.एकाच युद्धात जवळ जवळ 2 लाख शत्रुंना एकटाच मृत्युमुखी पाडणारा जगातील
एकमेव योद्धा.


अरे आपल्याला साधा 15 किलो चा सिलिंडर
उचलवत नाही तर विचार करा आपल्या वजनाइतक्या जड़ तलवारि उचलून कसे काय युद्ध जमत असेल या मावळ्यांना.. गर्व बाळगा की असे शूरवीर आपल्या महाराष्ट्राच्या
मातीत जन्माला आले.......


पुर्ण वाचुन झाल्यावर जर थोडासा पण अभिमान झाला तर share करा ...
पाहु द्या सगल्यांना कसे होते संभाजी महाराज 🐅🐅 

 

🚩🚩जयजिजाऊ...... 🚩🚩जयशिवराय🚩🚩🚩

Read More ...
user avatar
Vikas G
General Knowledge - 2368 msgs

एक घडलेली  गोष्ट , 1979  सालची अशीच एक सकाळची वेळ होती,त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता, फारशी गर्दी नव्हती, काही लोकांचीच ये , जा, होती,एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमत भगवत गीता वाचत होते, तेवढ्यात एक नास्तिक  तरुण उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला , आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली , गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती, त्या तरुणाने एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर, आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता, यावर मात्र त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण, पुढे काय करणार आहेस, पण अगदी शांतपणे, त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे, सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा आटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे, पुढे मोठ्या तुसडेपणाने तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे, त्याने बरीच मुक्ताफळे उधळली, तरीही ती व्यक्ती शांतच होती, त्या गीता वाचणाऱ्या व्यक्ती ने उठून आसन गुंडाळले तसे एकदम 4  दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले व एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला व आदबीने सलाम करून दार उघडून उभा राहिला, एवढं सगळं पाहिल्यावर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला व त्या व्यक्तीची क्षमा याचना करू लागला, त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली , तेंव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की,      ज्या संस्थेत तू  करियर करण्यास संशोधन करण्यास आला आहेस ना त्या भाभा आटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे, डॉ, विक्रम साराभाई, त्यावेळी मात्र तो नास्तिक, देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला, माफी मागू लागला, तरीही डॉ, साराभाई शांतच,,, ते म्हणाले जर या जगात एखादी गोष्ट आहे तर नक्कीच त्याचा कोणीतरी निर्माता आहे, मग ती आजची असो की महाभारत कालीन,  आणि त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते, तेंव्हा टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा, सर्व सायन्स देखील यातच आहे,  ही गोष्ट घडली तेंव्हा भारतीय पातळीवरच्या विविध 13  रिसर्च संस्था या डॉ, साराभाईच्या नावावर होत्या तर तत्कालीन पंतप्रधान स्व, इंदिराजी गांधी यांनी अणू संशोधन मंडळाचेही अध्यक्ष म्हणून डॉ, साराभाई यांची नियुक्ती केली होती, चालू वर्ष हे डॉ, विक्रम साराभाई यांचे  99 वी जयंती वर्ष आहे, म्हणून एक आठवण, त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन ....

Read More ...
user avatar
Raju H
General Knowledge - 2687 msgs

दोन मूत्रपिंड [ किडनी ] देणारे उपलब्ध आहेत. एक 27 वर्षीय माणूस मृत्यूच्या त्याच्या बेड मध्ये आहे. त्याची शेवटची इच्छा त्याच्या मूत्रपिंडांना दान करणे आहे. त्यांचा रक्त गट आहे.* *AB+ve* 
*मोब: * 9979792202 7096215808* *🌸🙏🍀🙏🌺कृपया पुढे पाठवा एखाद्या गरजूला मदत होईल.

Read More ...
user avatar
Amit W
General Knowledge - 1819 msgs

*प्यादीच का मरतात ???*
(बुद्धिबळ आणि वास्तवता)

*मला खूप दिवसांपासून प्रश्न पडला आहे की, बुद्धिबळात दोन्ही बाजूकडून प्यादीच पुढे का असतात?*

उभा-आडवा मारा करु शकणारे बलदंड *हत्ती*, कानाकोपऱ्यातून तिरप्या चालीने वेध घेऊ शकणारे काटक *उंट*, उलटसुलट अडीच घरां पल्याड जाऊन हल्ला चढवू शकणारी *घोडी*, सर्वशक्तिमान *वजीर* आणि महामहीम *बादशहा* एवढी सारी मातब्बर मंडळी मागच्या रांगेत आणि तोफेच्या तोंडी कोण तर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली, किरकोळ देहयष्टीची, एक-एक घर पुढे सरकणारी प्यादी! *हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला प्रकार झाला!*

बरं, *इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर मागे फिरु शकतात*. प्याद्यांना ती मुभा नाही. एवढंच काय जीवाच्या आकांताने एखाद्या प्याद्याने शुत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून *अंतिम रेषा गाठलीच तरी पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच होणार*. तसा रिवाजच आहे!

थोडक्यात काय तर प्यादी जन्माला येतात ती बळी जाण्यासाठीच. प्याद्यांनी फक्त लढायचं, तेही समोरच्या प्याद्यांविरुद्धच. का ते विचारायचं नाही.

*सरपटत-फरफटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार. स्मारकं मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जाणार*. इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार. उदोउदोही मानकर्‍यांचाच होणार. *कारण, तसाच रिवाज असतो!*

*कार्यकर्त्यांनी समजून घ्या! आणि जर राजकारणातून बाजूला होण्याची इच्छा झालीच तर व्यवसायाकडे वळा* ..........

धन्यवाद......!
👏🏻🙏🏻👏🏻🙏🏻👏🏻🙏🏻👏🏻

Read More ...
user avatar
Dipak P
General Knowledge - 2287 msgs

सर्व नोकरी करणाऱ्यांसाठी महत्वाचे

"वेळ असेल तर वाचा"
------+++++------------
एक खारुताई रोज आपले काम इमाने इतबारे करत असे.

ती जरुरीपेक्षा जास्त काम करून पण खुश राही.

कारण ती ज्या साठी काम करत होती, त्या जंगलचा राजा सिंहाने तिला १० पोती अक्रोड द्यायचा शब्द दिला होता.

खारुताई काम करता करता थकली, की तिला थोडा आराम करावा असे वाटे. पण तिला लगेच राजाचा शब्द आठवायचा आणि परत कामाला लागायची.

खारुताईला जेंव्हा इतर खारीं खेळतांना, मस्ती करतांना दिसत तेंव्हा तिला पण खेळायची इच्छा व्हायची, पण लगेच तिला अक्रोड आठवायचे आणि ती परत कामाला लागायची.

राजा खूप इमानदार होता. त्याने शब्द दिला होता तर तो निश्चित पूर्ण करणार.

असाच एक दिवस उजाडला आणि सिंहाने खारुताईला १० पोती अक्रोड दिले आणि तिला स्वातंत्र्य बहाल केले.

अक्रोडांच्या पोत्यांवर बसून खारुताई विचार करू लागली की आता या अक्रोडांच मी काय करू..? 

अख्ख आयुष्य काबाड कष्ट करून मी दातांचा भुगा करून घेतला, आता अक्रोड चावायला दात कुठे आहेत..? 

ही गोष्ट आज आपल्या पैकी अनेकांची जीवन कहाणी बनली आहे.

माणूस आपल्या इच्छा मारत जीवनभर नोकरी-व्यवसाय करतो आणि पैसे कमवण्यात आयुष्य खर्ची घालवतो.

आणि निवृत्त अशा वयात होतो की ज्या पैशांसाठी आयुष्यभर काबाड कष्ट केले, त्या पैशांचा उपभोग घ्यायची क्षमता नष्ट झालेली असते.

तोपर्यंत घर चालवण्यासाठी पुढची पिढी सारसावलेली असते. 

त्यांना या गोष्टीची कल्पना आणि जाणीव असेल का, की आपण हा फंड किंवा बँक खात्यात रक्कम शिल्लक ठेवण्यासाठी किती इच्छा मारल्या असतील?,
किती त्रास सहन केला असेल? किती स्वप्न अर्धवट राहिली असतील?

अशा फंडाचा आणि शिल्लक रकमेचा काय फायदा, की जी कमावण्यासाठी आपलं अख्ख आयुष्य खर्च होतं आणि आपण त्याचा उपभोग पण घेऊ शकत नाही.

म्हणून खूप काम करूया पण आनंद घेत घेत करूया.

व्यस्त राहूया पण आपली ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपलब्ध पण राहूया.... 🙏🏻🙏🏻

Read More ...
user avatar
Amod P
General Knowledge - 2111 msgs

Click on your birth month link below and read what it says about you?

January - http://bit.ly/birth-jan

February - http://bit.ly/birth-feb

March - http://bit.ly/birth-mar

April - http://bit.ly/birth-april

May - http://bit.ly/birth-may

June - http://bit.ly/birth-june

July - http://bit.ly/birth-july

August - http://bit.ly/birth-august

September - http://bit.ly/birth-sept

October - http://bit.ly/birth-october

November - http://bit.ly/birth-nov

December - http://bit.ly/birth-dec

And 
Share with all your Friends and Family..
 😇😇

Read More ...
user avatar
Vinod P
General Knowledge - 5815 msgs

*सावधान!!*

किसीके घर में *सफ़ेद मटका* हो तो तुरंत *फेक देना* । यह कोई सफ़ेद मिट्टी से नहीं बल्कि GSFC के फेंके हुऐ वेस्ट में से बनता हैं, जिससे केन्सर और लकवा जैसे भयंकर रोग हो सकते है ।

Read More ...
user avatar
Raju H
General Knowledge - 2687 msgs

दोन मूत्रपिंड [ किडनी ] देणारे उपलब्ध आहेत. एक 27 वर्षीय माणूस मृत्यूच्या त्याच्या बेड मध्ये आहे. त्याची शेवटची इच्छा त्याच्या मूत्रपिंडांना दान करणे आहे. त्यांचा रक्त गट आहे.* *AB+ve* 
*मोब: * 9979792202 7096215808* *🌸🙏🍀🙏🌺कृपया पुढे पाठवा एखाद्या गरजूला मदत होईल.

Read More ...
user avatar
Vinod P
General Knowledge - 5815 msgs

*नवीन चीप बेस ए.टी.एम. कार्ड* नवीन फसवणूकीचे प्रकार *PART 2*
सध्या सर्वच बॅंकांनी जूने ए.टी.एम. कार्ड बदलवून नवीन चीप बेस ए.टी.एम. कार्ड कंपलसरी केलेले आहेत तसेच 31.12.2018 नंतर जूने ए.टी.एम. कार्ड पुर्णपणे बंद होणार आहे. त्यातच काही बॅंकांनी संप सुध्दा केलेला आहे. 
याच परीस्थीतीचा फायदा घेवून आॅनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार आपल्याला फोन करून वरील प्रमाणे परीस्थीती सांगतील व तुम्हाला नवीन ए.टी.एम. कार्ड घेण्याकरीता तुमच्या अकाऊंटची माहिती मागतील. अशी कोणती माहिती देवू नका व आपल्या आप्त स्वकीयांना व मीत्र परीवाराला याबाबत जागरूक करा.

 पोलीसांतर्फे जनहितार्थ.

SHARE IT AS MUCH AS U CAN. AWARENESS AND PREVENTION IS THE BEST REMEDY FOR SUCH OFFENCES. 
🙏 *Admin*🙏

Read More ...
user avatar
Santosh T
General Knowledge - 1964 msgs

#भावपूर्ण #श्रद्धांजली 

राजकारणातील आदर्श नेता हरवला.... 
तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकणार.....
असा माणूस पुन्हा होणे नाही....😢 😢
वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...,
देशाला लाभलेले एक उत्कृष्ट पंतप्रधान.... भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी..

२५डिसेंबर १९२४ ते १६ आॅगस्ट २०१८

मृत्यु अटल है....... 
और अटल अमर है......
में जी भर जिया, मैं मन से मरुं, लौट कर आऊंगा कुच से क्यों डरु.... ....
भारत रत्न श्रधेय अटलजी अमर रहे.शत् शत् नमन.
🙏 🙏🙏🙏
 
भारतरत्न परम श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना
भावपुर्ण श्रध्दांजली 
🙏🙏🙏

Read More ...
user avatar
Nandakumar K
General Knowledge - 2073 msgs

आदिवासी लोकांनी गणपती मांडू नये...का...?*
▪.................▪.................▪
*13 सप्टेंबर* ला गणेश चतुर्थी आहे तर 23 सप्टेंबर ला अनंत चतुर्थी. असे *अकरा दिवस* हा उत्सव चालणार आहे. हा उत्सव हिंदूच्या उत्साहातील महत्वाचा उत्सव आहे आणि हिंदूनी गणपती  उत्साह आनंदाने  साजरा करावा. परंतु आदिवासी बांधवांनी गणपती मांडु नये . तर का? *आदिवासी हे हिंदू नाही*.( _सुप्रीम कोर्टाचा निकाल त्रिलोक सिंह विरूध्द गुलाब एस.ए./100/66/दिनांक 15 जाने.1971च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आदिवासी हिंदू नाही._) प्रत्येक धर्माचे सण, उत्सव, चालीरीती परंपरा असतात. प्रत्येक धर्माला आपल्या धर्मानुसार वागण्याचे स्वातंत्र्य *संविधानाने* दिले आहे. (कलम 25) इथे सांगायच म्हणजे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात *हिंदूच* अनुकरण करतात.आदिवासी बांधव गणेश उत्साहाच्यावेळी गणपतीची स्थापना आपल्या घरी किंवा आपल्या गावात मोठ्या उत्साहात साजरा करतात. पण ते आपल्या भविष्यासाठी किती *हानिकारक* आहे हे त्यांना कळतं नाही. आपण जर गणपतीची स्थापना आपल्या घरी केली तर आपण हिंदू धर्म अंगिकारत आहो असा अर्थ होतो आणी Tiss ने असा ही अहवाल तैयार केलि आहे कि जो गणपती, दुर्गा, शारदा व कोणतेही मूर्ती पूजा करणारे हिंदूच आहेत  *सुप्रीम कोर्टाने* आधिच निर्णय दिला आहे की आदिवासी हे हिंदू नाही. देशात मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी साजरी होते पण मुस्लिम बांधव कधी गणपती मांडत नाही, ख्रिश्चन बांधव गणपती मांडत नाही, जैन, बौद्ध बांधव कधी गणपती मांडत नाही. मग  आदिवासीयांनीच गणपती का मांडावे. दोन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील *बेलगांव* या गावातिल आदिवासी गणपती मांडणार नाही  असा शपथ घेतला. त्यांच काहीही अडला नाही. उलट त्यांचे दरवर्षी   गणपतीवर होणारे तिस हजार खर्च वाचतात. त्याच पैशांनी ते दरवर्षी गोंङी पुनेम संमेलनाच आयोजन करत असतात. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील *मालदुगी* गावात दुर्गा उत्सव बंद करुन रावन महोत्सव सुरू केले. हे एक *क्रांतिकारकच* पाऊल म्हणावं लागेल. असे प्रत्येक आदिवासी गावातील बांधवांनी विचार केला तर त्यांचे कितीतरी पैसे उरणार आणि तेच पैसे समाजाच्या उद्धारासाठी खर्ची लागणार आणि  आपल्या धर्माचा स्वंरक्षण त्यांचाकडुन होणार.

आणी म्हणून यावर्षी मी *गणपती,शारदा, दुर्गा* मांडणार नाही किंवा भाग घेणार नाही व त्यांना कोणतेही आर्थिक मदत करणार नाही. अशी प्रतिज्ञा प्रत्येक आदिवासी बांधवांनी केली तर निश्चितच समाजाला फायदा होईल. पैसा वाचनार, वेळ वाचणार व मी कोण..? याची जाणिव *होईल.

 

*_जय सेवा....._*
    *_जय आदिवासी......_*

Read More ...
user avatar
Vaishali U
General Knowledge - 1993 msgs

||साखरेचे दुषपरिणाम||

*साखर* तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.
 *"त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी *गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते."* 

*साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय  घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...*
👇👇🇮🇳🇮🇳💥💥

(१) --  साखर बनवण्याच्या
         प्रक्रियेमध्ये *गंधकाचा*
         सर्वाधिक वापर केला
           जातो. गंधक म्हणजे 
              काय तर   
     *फटाक्यांमधील मसाला*!
ⓐⓡⓐ

(२) -- *गंधक* हा अत्यंत जड
        धातू असून एकदा का गंधक
        शरीरात गेले की शरीराबाहेर
        पडतच नाही. 
ⓐⓡⓐ

(३) -- साखर ही *कॉलेस्ट्रॉल*
        वाढवते. *कॉलेस्ट्रॉल*
       वाढल्यामुळे हृदयविकाराचा
        झटका येतो. 
ⓐⓡⓐ

(४) -- साखरेमुळे *शरीराचे-*
        वजन अनियंत्रित वाढते* व
     त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. 
ⓐⓡⓐ
(५) -- साखर ही *रक्तदाब*
          वाढवते.
ⓐⓡⓐ

(६) -- साखर ही *मेंदूला-*
      *झटका* येण्याचे एक मुख्य-
      कारण आहे.
ⓐⓡⓐ

(७) -- साखरेतील गोडपणाला
     आधुनिक चिकित्सा पद्धतीत
     *सुक्रोज* म्हटले जाते.
      *माणसे व जनावरे हे-*
       दोघेही *सुक्रोज* पचवू
       शकत नाहीत.
ⓐⓡⓐ

(८)-- साखर तयार करण्याच्या-
       प्रक्रियेमध्ये *तेवीस*
      हानीकारक रसायने वापरली
       जातात.
ⓐⓡⓐ

(९)--  साखर ही *मधुमेह*
       होण्याचे एक मुख्य कारण
       आहे.
ⓐⓡⓐ

(१०) -- साखर हे पोटातील
       *जळजळीचे*एक मुख्य  
      कारण आहे.
ⓐⓡⓐ

(११) -- साखर ही शरीरातील
     *ट्राइग्लिसराइड* वाढवते.
ⓐⓡⓐ

(१२) --  साखर हे *पॅरेलेसीस*
         झटका अथवा *लकवा*
          होण्याचे एक मुख्य कारण
        आहे.
ⓐⓡⓐ

(१३) कृपया आपणास जितके-
      शक्य होईल तितके साखर
        सोडून गुळाचा वापर करणे-
         सुरू करा.

*वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*

Read More ...
user avatar
Vikas G
General Knowledge - 2368 msgs

🏵🏵*आश्विन नवरात्रौत्सव*🏵🏵🏵⚜⚜*अष्टम दिन*⚜⚜
🌺🌺🌺*श्री महागौरी माता*🌺🌺🌺
🌺*श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:।*🌺
🌺*महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।*🌺
🌺*दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत.*🌺
🌺*महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.*🌺
🌺*आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता.*🌺
🌺*जन्म कोटि लगि रगर हमारी। बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।*🌺
🌺*या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.*🌺

Read More ...
user avatar
Kailas G
General Knowledge - 1690 msgs

फेलिक्स बुमगार्टनर या ऑस्ट्रियन साहसीवीराने 1,28,000 फूटांवरून (जेथून अंतराळ सुरू होते) उडी मारली. तो 1357.64 किमी प्रति तास(आवाजाच्या वेगापेक्षा अधिक) इतक्या वेगाने खाली आला व सुखरूप उतरला. मानवी इतिहासा प्रथमच एवढ्या उंचीवरून उडी मारली गेली.  

Read More ...
user avatar
Pradnya G
General Knowledge - 2414 msgs

पाहिलं मोबाईल इंटरनेटला  ₹300/- per GB मोजावे लागत असे,
आता ते  ₹5.00/- per GB. मोजावे लागतात.

Saving  ₹295 /-  per GB
महिन्याचा वापर - 30 GB
महिन्याची बचत – ₹295/- x 30 = ₹8,850/-

एका कुटुंबातील दिवसाचा वापर = 3 GB,    महिन्याची कुटुंबाची बचत -  ₹26,550/-

कुटुंबाची वार्षिक बचत
₹26,550/- x 12 = ₹3,18,600/-
 
मोदींचा कार्यकाळ 5 वर्ष
कुटुंबाची 5 वर्षाची एकूण बचत – ₹3,18,600/- x 5 = ₹15,93,000/-

 आता कोणी हे विचारू नका की, मला 15 लाख रुपये मिळालेच नाही 😜

🤣🤣🤣🤣🤣

Read More ...
user avatar
Satish P
General Knowledge - 1923 msgs

*'आधार'मुळे भारताला ‘सिव्हील डेथ’चा धोका: एडवर्ड स्नोडेन*

अमेरिकेची गोपनिय माहिती लीक करणारा अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेनने ‘आधार’बाबत मोठा धोका व्यक्त केला आहे. UIDAI ने आधारच्या माध्यमातून सार्वत्रिक दक्षता प्रणाली तयार केली आहे. मात्र भारतीयांनी आधारशी सर्व काही जोडल्याने, भारताला ‘सिव्हील डेथ’ अर्थात व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका आहे, असं स्नोडेनने म्हटलं आहे.

आधार नंबरशी फोन नंबर लिंक केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्या वादाबाबत बोलताना स्नोडेनने हा धोका व्यक्त केला. स्नोडेनने त्यासाठी नुकतंचमोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झालेल्या आणि नंतर गुगलने स्पष्टीकरण दिलेल्याआधारच्या कस्टमर केअर नंबरचा दाखला दिला.

स्नोडेन म्हणाला, “यूआयडीएआयने हॅकिंगप्रकरणात ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यामध्ये फायदे कमी आणि दक्षता घेण्याच्या सूचनाच जास्त दिल्या आहेत”.

पत्रकारांनी जयपूरमध्ये आयोजिक केलेल्या एका कार्यक्रमात स्नोडेनने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. त्यामध्ये त्याने ‘आधार’बाबत आपली मतं व्यक्त केली.

“भारतातील आधारसक्ती धडकी भरवणारी आहे. कारण भारतात प्रत्येकाला आधार सक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात केली आहे की, तुम्ही तिथे बाळाला जन्म देण्यापूर्वी असो किंवा बाळाचा जन्म दाखला असो, सगळीकडे आधारसक्ती आहे”, असं स्नोडेनने नमूद केलं.

ज्या एजन्सी, संस्था आधार माहितीचा गैरवापर करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा सल्ला यावेळी स्नोडेनने दिला. शिवाय स्नोडेनने UIDAI करत असलेल्या युक्तीवादावरही टीका केली.

आधार हा एक मोठा घोटाळा आहे. त्यामुळे यूआयडीएआयने त्याबाबत योग्य त्या मार्गाने  युक्तीवाद करावा. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर खटले भरण्यापेक्षा त्यांनी सिस्टीम सुधारण्यावर भर द्यावा, असं स्नोडेन म्हणाला.

तुमचे हक्क, माहिती सुरक्षितता किंवा तुमच्या प्रायव्हसीची चिंता करु नका, असं सरकार सांगत असलं, तरी तीच मोठी फसवणूक आहे.  ही जर्मनीच्या गोबेल्स नीतीशी नातं सांगणारं आहे, असा आरोपही स्नोडेनने केला.

भारतात आज जिकडे तिकडे आधार नंबर मागितला जातो. आधारशिवाय एकही काम होत नाही.  त्यामुळे तुमचा आधार नंबर सर्वत्र पसरत असल्यामुळे हळूहळू तुम्ही प्रत्येक ठिकाणी अडकत आहात, असं स्नोडेनने नमूद केलं.

https://abpmajha.abplive.in/technology/indians-could-face-civil-death-with-aadhaar-linking-snowden-576425/amp

Read More ...
user avatar
Shalan M
General Knowledge - 2307 msgs

*पक्षी मरतांना कुठे जातात?*

नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी  लेखाचा मी केलेला अनुवाद

प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर बसुन नेहमीप्रमाणे आजुबाजुच्या घनदाट वटवृक्षांवर  चिवचिवाट करणार्‍या माझ्या सोयर्‍यांना ऐकत होतो. सर्वच जण तिथे कायमचेच रहिवासी होतो. माझी सकाळ आणि त्यांचे वटवृक्षांमधुन चिवचिवणे हा दररौजचा उपक्रम. त्या दिवशी मात्र माझ्या मनात माहित नाही पणगेली कित्येक वर्षे मी या माझ्या मित्रांना चिवचिवाट करतांना, भांडतांना ,मारामार्‍या करतांना बघीतलेय पण आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या काँलनीच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही. हा एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षि आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.
 मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गीक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मी गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दीले नाही. अनेक पक्षी निरिक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही.

आणि मग ह्या प्रयत्नातच मला एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds"
ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दीलेय की कुणीही जगात नैसर्गीक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीहि स्विकारलेले नाही. लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दीलिय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,
पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतित ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात. 
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जिवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समिप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गीक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. यावरुन बीशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रीय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जिवनकाल संपत आलाय. आणि ही जाणिव हौताच पक्षि आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही तो पर्यत ते वरती वरतीचचढत जातात. बीशप ची ही थेअरी मला तरी स्विकारार्ह वाटते  कारण दूसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजुनपर्यत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडुन कुठलेही खंडन झालेले नाही. ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणु शकतो की पक्षी मानवापेक्षा  उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव  होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवु शकतो की त्याने खूप जगुन झालेय,बघून झालेय आणि तो आनंदाने कसलिही खंत चिंता न बाळगता उंच उडून  शरीराचे  विघटन करुन टाकतो.न वयानूसार येणार्‍या व्याधी,न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सिमा नाही , पासपोर्ट नाही, पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्विकारणारी. आणि स्वतःच्या मृत्युची वेळ पण स्वतःच निश्चित करणारी... मोक्ष अजुन काय वेगळा असतो?

Read More ...
user avatar
Vilas L
General Knowledge - 2553 msgs
18B1321F-1232-09BF-CBB8-B60EB9CB59B3.jpg
user avatar
Nilesh N
General Knowledge - 2569 msgs

Congratulation to all of us Our national anthem "Jana Gana Mana... "is now declared as the BEST ANTHEM OF THE WORLD by UNESCO. Just few minutes ago.

Kindly share this. 
Very proud to be an INDIAN.

अभिनंदन मित्रांनो आपल्या देशाच राष्ट्र गीत "जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता "पूर्ण विश्वामधले सर्वश्रेष्ठ राष्ट्र गीत घोषित केल आहे.. , यूनेस्को ने याची घोषणा केली आहे.. , एक भारतीय म्हणून मला मनापासून गर्व वाटत आहे.... कृपया सर्व भारतीय बांधवांनी ही पोस्ट शेअर करा आणि याचा आनंद दुसर्यांना वाट़ा😊💐

Read More ...
user avatar
Raju H
General Knowledge - 2687 msgs

दोन मूत्रपिंड [ किडनी ] देणारे उपलब्ध आहेत. एक 27 वर्षीय माणूस मृत्यूच्या त्याच्या बेड मध्ये आहे. त्याची शेवटची इच्छा त्याच्या मूत्रपिंडांना दान करणे आहे. त्यांचा रक्त गट आहे.* *AB+ve* 
*मोब: * 9979792202 7096215808* *🌸🙏🍀🙏🌺कृपया पुढे पाठवा एखाद्या गरजूला मदत होईल.

Read More ...
Message Masala
Copyright 2021 © Message Masala | All Rights Reserved
The content and images used on this site are copyright protected and copyrights vests with the respective owners. The usage of the content and images on this website is intended to promote the works and no endoresement of the artist shall be impiled. Unauthorized use is prohibited and punishable by law.